जिला

तांत्रिक अडचणीमुळे व जुन्या किट मुळे बंद पडलेले आधार केंद्र तात्काळ सुरु करून नागरिकांची हेळसांड थांबवा- महेंद्र गायकवाड यांची मागणी

नवीन आधार केंद्र सुशिक्षित बेरोजगार,दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, परितक्त्या, विधवा महिला व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना द्या

 

नांदेड: नांदेड शहरात व जिल्ह्यात कांही आधार केंद्र तांत्रिक अडचणीमुळे व जुन्या किट मुळे बंद अवस्थेत असल्याने विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याने सदरील आधार केंद्राना नवीन व जास्तीच्या किट उपलब्ध करून बंद अवस्थेतील आधार केंद्र व नवीन आधार केंद्र सुशिक्षित बेरोजगार,दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, परितक्त्या, विधवा महिला व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना देऊन नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या कडे केली आहे.

नांदेड शहरात व जिल्ह्यात तांत्रिक अडचणीमुळे कांही आधार कार्ड केंद्र बंद अवस्थेत आहेत तर कांही आधार कार्ड केंद्राच्या किट जुन्या अवस्थेत असल्याने नागरिकांचे आधार अपडेट, नवीन आधार कार्ड काढणे, व आधार कार्ड संबधी अनेक कामे होत नाहीत. तसेच सध्या विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांना नवीन आधार कार्ड ची आवश्यकता आहे. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील विद्यार्थी,जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष यांना नवीन आधार कार्ड, आधार कार्ड अपडेट, तसेच आधार कार्ड संबधी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

सन 2012 पासून जुन्या आधार कार्ड किट वरच ऑपरेटर काम करीत असल्याने संथ गतीने कामे होत आहेत.सध्या जिल्ह्यात सुपरवाइजर व ऑपरेटरची संख्या उपलब्ध असून हि नवीन किट नसल्या कारणाने आधार कार्ड केंद्राची सुविधा विस्कळीत झाली आहे. सध्या स्थितीत आधारकार्ड अपडेट करण्यासाठी व नवीन आधार कार्ड काढण्यासाठी नवीन किटची जास्त प्रमाणात गरज आहे. जुन्या किटमुळे तांत्रिक अडचण निर्माण होत आहे व किटची संख्या कमी असल्याने नागरिकांची आधारची कामे होत नाहीत त्यामुळे विलंब लागत आहे.या कारणाने शहरातील नागरिकांना रात्रभर पोस्ट ऑफिस समोर व तहसील कार्यालयासमोर रांगेत उभे रहावे लागत आहे.

तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ, नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ नांदेड शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नवीन आधार कार्ड केंद्र व बंद अवस्थेत असलेले आधार कार्ड केंद्र त्वरित सुरु करून हे आधार कार्ड केंद्र सुशिक्षित बेरोजगार, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी परितक्त्या, विधवा महिला व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना देऊन नागरिकांची हेळसांड थांबवावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *