जिला

आज सकाळी 8 ते 9 जिल्ह्यात महाश्रमदान : ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

 

नांदेड, 24- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा भाग म्हणून जिल्ह्यात आज गुरुवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे.

या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, शाळा, मंदिर, बाजारपेठा, ग्रामपंचायत आवार तसेच पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांची स्वच्छता करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.

महाश्रमदान उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, महिला बचत गट व समाजसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्‍यावा, असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले आहे

 

स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्‍यान दररोज वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कालावधीत आज 25 सप्टेंबर रोजी महाश्रमदान, 26 सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निर्मित प्रकल्पांचे उद्घाटन, 27 सप्टेंबर रोजी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन परिसराची साफसफाई तसेच ग्रामपंचायत स्वच्छ वार्ड स्पर्धा, 28 सप्टेंबर रोजी सफाई मित्र सुरक्षा शिबिर व एक खिडकी योजनेव्‍दारे पात्र लाभार्थ्यांसाठी मोहीम, 29 सप्टेंबर रोजी एक दिवस, एक तास या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता विषयावर धडे, 30 सप्टेंबर रोजी स्वच्छतेची वाहने व उपकरणे यांची स्वच्छता व नुतनीकरण, 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा व 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता दिवस साजरा करून ग्रामसभा तसेच अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचे गाव पातळीवर यशस्वी आयोजन करण्यासाठी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी योग्य ती नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *