क्राईम

दोन मुलींसह ट्रेन खाली झोकून आयुष्य संपवलं, जगण्यासाठी पैसेच नसल्याने आई हतबल

रायगड: अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण हे वाढू लागले आहे कौटुंबिक आणि आर्थिक गुंतागुंतीचे प्रश्न यामुळे सारासार विचार न करता दुर्दैवाने टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रकार घडू लागले आहेत. कोकणात रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथे अशीच हादरवून टाकणारी घटना घडली असून आईसह दोन मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने आता जगायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर या आईने आपल्या दोन मुलींसह मृत्यूला कवटाळले आहे. अक्षरशः हृदय हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे.

वहिनी मला माफ करा, मी तुम्हाला बोलले पण माझ्याकडून होत नाही, मी दोन मुलींना घेऊन रेल्वे खाली आत्महत्या करायला जात आहे मोहनमुळे, असा मेसेज करून या महिलेने दोन मुलींसह आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मोहनला इकडे येऊन रूम सोडायला सांगा आणि माझे जे काही देणे आहे ते त्याला द्यायला सांगा असाही उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला होता. या मेसेजची माहिती रीना यांच्या मैत्रिणीला कळताच या मैत्रिणीने तात्काळ गोरेगाव पोलिस स्टेशन गाठले रीना यांनी त्यांच्या वहिनीला केलेला मेसेज दाखवला त्यानंतर वेगाने सूत्रे हलली पण रीना आपल्या दोन मुलींसह हे जग सोडून गेल्या होत्या.

गोरेगाव येथील गावडे कॉम्प्लेक्स या वसाहतीत राहणाऱ्या रीना जयमोहन नायर या महिलेने जिया आणि लक्ष्मी या चौदा आणि अकरा वर्षांच्या मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली पहाटे तीन वाजता आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान रीना यांचे यापूर्वी एक लग्न झाले होते पहिल्या पतीपासून एक मुलगी होती तर दुसऱ्या पतीपासून एक मुलगी अशा दोन मुली रीना यांना होत्या मात्र रीना या आर्थिक संकटात त्या सापडल्या होत्या. मुलींचं शिक्षण, खोलीचे भाडं या सगळ्यामुळे रीना हतबल झाल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती गोरेगाव पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

त्यात त्यांना कर्जही होत. पती कोणतीही आर्थिक मदत करत नव्हता. यामुळे आता जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रीना या मूळच्या गोरेगाव माणगाव परिसरातील आहेत. त्यांनी केरळ येथील जयमोहन नायर यांच्याशी प्रेमविवाह केला होता. पण, पती दुसरीकडे रहात होता दोन्ही मुलींची शाळेची फी, क्लासची फी, खोलीचे भाडे, दैनंदिन व्यवहारातील खर्च हे सगळे खर्च भागवणे कठीण झाले होते. इतकेच नव्हे तर यामुळे मोबाईलचे हप्ते देखील थकले होते. त्यामुळे त्यांनी अखेर मेसेज करून आपली जीवनयात्रा दोन मुलींसह संपवल्याने माणगाव गोरेगाव परिसर हादरला आहे.

या सगळ्या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेंद्र पाटील, सोपान रासकर, यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही करत या सगळ्या आत्महत्या प्रकरणाची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात केली आहे. माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्री नवाले यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *