शहर

इतवारा बाजार परिसरात पाणी-वीज समस्यांनी नागरिक त्रस्त

महावितरण व महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रिय कारभाराचा नागरिकांकडून तीव्र निषेध.

 

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड शहरातील इतवारा बाजार परिसरात पाणी व वीज या मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांच्या नाराजीचा कडेलोट झाला आहे. नळाला पाणीपुरवठा सुरू होताच महावितरणकडून वीजपुरवठा अचानक खंडित केला जात असल्याने पाणी उचलण्यासाठी पंपही सुरू करता येत नाही. त्यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

येतं ते पाणी दूषित, आरोग्यास धोका नळातून येणारे पाणी काळसर व दुर्गंधीयुक्त असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग व इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

तातडीने दखल घ्यावी — मागणी नागरिकांच्या या गंभीर प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा नियमित सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *