क्राईम

तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी साईलाला गजाआड; वाराणसीतून अटक

नांदेड (प्रतिनिधी) – शहरात ४ एप्रिल रोजी घडलेल्या तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी Sailala Deepak Singh Gaherwar याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील Varanasi येथून अटक केली आहे. त्याच्यासह आणखी एक आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

ई-स्क्वेअर परिसरात ४ एप्रिलच्या रात्री दोन टोळ्यांमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये अर्जितसिंह चव्हाण, सय्यद आवेज आणि मोहम्मद अरवाज यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी सोनू राऊत, साहेर, शाहरुख उर्फ कबूतर शेख अजगर आणि शेख उवेद शेख अजगर यांना अटक केली होती, तर मुख्य आरोपी साईलाला फरार होता.

फरार आरोपींच्या शोधासाठी नांदेड, सोलापूर आणि पुणे येथे विशेष पथके पाठवण्यात आली होती. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक Sunil Bhise यांना २१ एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार साईलाला व त्याचा साथीदार नितेश इंगळे वाराणसीत लपल्याचे समोर आले.

या माहितीनुसार भिसे आणि त्यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने २२ एप्रिल रोजी दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईत हवालदार ब्रह्मानंद लामतुरे, शिवराज ढवळे, प्रदीप गर्दनमारे, राजू बुंगई, व्यंकट गंगुलवार, हेमंत विचकेवार तसेच सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर आणि दीपक ओढणे यांचा सहभाग होता.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *